संयोगीताराजे छत्रपती यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा पारा चढला; म्हणाले,”काळाराम मंदिरात सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा…”

मुंबई : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा खळबळजनक आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकॉउंटवर एक पोस्ट लिहिली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या प्रकरणावर संतप्त झाले आहेत. याविषयी त्यांनी एक ट्विट केले आहे. काळाराम मंदिरातल्या सनतानी मनुवाद्यांचा माजोरडेपणा समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादीआजही छत्रपतींना शुद्र समजतात.बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झालं. जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात


अजून कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो. याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदीर प्रवेशा साठी आंदोलन केले होते. काही सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फुशारक्या मारतात. असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, काल रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्यानंतर वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.  त्यांच्या या पोस्टमुळे सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे.