अहमदनगर – ५ लाखांच्या खंडणीसाठी वकिल दांम्पत्याचा खून

नगर – राहुरी येथील बेपत्ता झालेल्या वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करून खून झाल्याची घटना पोलीस तपासात पुढे आली आहे. या बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात आरोपींचा शोध घेऊन एका सराईत आरोपीस तिघांना ताब्यात घेतले आहे. राजाराम जयवंत आढाव (वय ५२), मनिषा राजाराम आढाव (वय ४२, दोन्ही रा. मानोरी, ता. राहुरी, जि. नगर), असे खून झालेल्या वकिल दांम्पत्यांचे नाव आहे.

किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय ३२, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. नगर), भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. नगर), बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. नगर) यांना ताब्यात घेतले आहे. यातील दत्तात्रय दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुन, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी असे विविध प्रकारचे गंभीर स्वरुपाचे संगमनेर, राहुरी, पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. तर भैया उर्फ सागर साहेबराव खांदे याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

याबाबत माहिती अशी की, वकिल् दांम्पत्य हे गुरुवार (दि.२५) रोजी मानोरी येथून त्यांचे राहते घरुन राहुरी कोर्टामध्ये गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. याबाबत लता राजेश शिंदे (वय ३८, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तत्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने राहुरी येथील न्यायालयात तसेच परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत. याबाबत माहिती घेत असतांना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेली असल्याचे दिसुन आले. या कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग हा वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आले. व ही कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सराईत गुन्हेगार दुशिंग याला उंबरे येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह कट करुन वकिल दांम्पत्याला न्यायालयीन केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशिंग याने स्वत:चे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला.

त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केले. व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले. व त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले. आरोपीने सांगितलेल्या हकीगतीवरुन खात्री करता उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये वकिल दांम्पत्याचे मृतदेह आढळुन आले आहेत. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खर्से, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांच्या पथकाने कारवाई केली.

वकिलांच्या घरात पाच तास छळ
किरण दुशिंग याने स्वत:चे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केले. व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाकडून गुन्ह्याची उकल
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्ह्याची उकल करण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली होती. त्या तीन पथकाने राहुरी तसेच मानोरी, उंबरे परिसरातील सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेशन करून गुन्ह्याची उकल केली आहे.