पाकच्या 250 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर सज्ज

वी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आता भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मेगा प्लान तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्‍मिरच्या खोऱ्यात लपून बसलेल्या तब्बल 250 दहशतवाद्यांना घेरून ठार करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत असलयाचेही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्‍मिरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पाकच्या दहशतवाद्यांना देशात घुसखोरी करण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. कारण राज्यातील सर्व प्रशासकिय व्यवहार हा जम्मूतून करण्यात येतो त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गृहमंत्रालय यांनी एकत्र हा प्लान तयार केला. काश्‍मीर खोऱ्यात सध्या 250 दहशतवादी दबा धरून बसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यातच नुकतेच राज्यात पंचायत आणि नागरी निवडणुका पार पडल्या आहेत त्यामुळे या दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील प्रशिक्षित दहशतवादी बहुधा कमांड ट्रेनिंगखाली असतात. ते खोऱ्याच्या जंगलात दीर्घकाळ वास्तव्य करू शकतात. परंतु हा प्रदेश बर्फाच्छादित झाल्यानंतर त्यांना जंगलात राहणे कठीण होते. अशा परिस्थितीत तो सुरक्षित जागेच्या शोधात गावात येईल. सीमा ओलांडून परत जाणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्‍य आहे. जरी त्यांनी तसे केले तरी सैन्याच्या हाताने मारले जातील असे सांगण्यात येत आहे. यासर्व परिस्थितीचा फायदा भारतीय लष्कर घेणार असून दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment