पुणे जिल्हा | बारामती बाजार समितीची ई-नाम राज्यात अव्वल

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई सुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये 2019 पासुन रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे.

बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाचे रिअल टाईम ई लिलाव पद्धती देशामध्ये प्रथम 28 सप्टेंवर 2022 पासून सुरू केला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

भारत सरकारच्या ई-नाम योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करण्यासाठी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण विभागाने कृषी व्यापार संघातर्फे लघु चित्रपट बनविला जाणार आहे. त्याकरिता देशातून 8 राज्यांतील आठ बाजार समित्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात एक आणि ती पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीची निवड झाली आहे.

त्यानुसार डीडी किसान चॅनेल तर्फे बारामती बाजार समितीची विविध उपक्रमांची शुटींग करण्यात आली आहे. डीडी किसान चॅनेल ई-नाम प्रणालीला सहाय्य करणार आहे. त्यामध्ये शेतकरी, एफपीओ, व्यापारी, ई-नामच्या यशस्वी गोष्ट, चित्र प्रसारण करणार आहे.

यावेळी समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी बारामती बाजार समितीचे विविध उपक्रमांची माहिती सांगुन ई नाम प्रणाली चांगल्या प्रकारे राबविणे बाबत ग्वाही दिली.

पॉईंटर स्वरुपात घेणे…
ई नाम प्रमाणातील शेतमालाची नोंद

गेट एन्ट्री : 1 लाख
आवक : 7 लाख क्विंटल
शेतकरी नोंदणी : 61 हजार 830
केवायसी धारक (शेतकरी) : 1196 (कायमस्वरूपी), 44 खरेदीदार, 42 आडते
राज्यातील रेशीम कोष खरेदीदार : 7
तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील 7 खरेदीदार परावानाधारक नोंदणी

2022 पासून 1700 शेतक-यांची 131 टनाची कोष विक्री
रेशीम कोष खरेदीदार ऑनलाइन ट्रेडींगमध्ये सहभागी होत आहेत. रेशीम कोष लिलाव ऑनलाइन घेतले जातात. यामध्ये शेतकरी नोंदणी, गेट एन्ट्री, कोषाची गुणवत्ता तपासणी, सेल रेशो त्यानंतर ऑनलाइन लिलाव आणि अ‍ॅक्सिस बँक मार्फत ई पेमेंट केले जाते.

2022 पासुन 1700 शेतक-यांची 131 टनाची कोष विक्री होऊन साधारण 7 कोटीची उलाढाल झाली आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रामध्ये ई नाम प्रणाली द्वारे 100 टक्के ऑनलाइन पद्धती राबविणेत येत असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

भविष्यात गुळ, तेलबिया ई नाम प्रणालीत घेणार
भविष्यात गुळ आणि तेलबिया या शेतमाल ई-नाम प्रणालीमध्ये घेऊन त्याद्वारे ऑनलाइन पद्धती राबविणेचा समितीचा मानस आहे. बाजार समितीमध्ये येताना शेतक-यांनी नाव नोंदणी व शेतमालाची गेट एन्ट्रीसाठी सहकार्य करावे. तसेच खरेदीदार व आडते यांनी ई-नाममध्ये सहभागी व्हावे.

यामुळे देशातील बाजार समित्या एका ई ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर येणार असून आंतरराज्यातील व्यापारास चालना मिळणार आहे. तसेच देशभरातील शेतक-यांना त्यांच्या शेतमालास चांगला व रास्त दर मिळणार आहे.

धान्य मार्केटला ई नाम प्रणालीत परपेठेतून कमी प्रतिसाद मिळत असून शेतमालाचे ग्रेडींग होऊन ई नाम पोर्टलवर विक्री झाल्यास आंतरराज्य, इंटर मंडी ई लिलाव व ई पेमेंट होऊ शकतात अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी सांगितली.