भुवनेश्वर – ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ बीजेडी पक्षाशी युती करण्यासाठी भाजपने प्राथमिक बोलणी केली होती. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये ही युती होऊ शकलेली नाही ही बाब स्पष्ट झाली आहे.
त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप एकट्याने उतरेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी म्हटले आहे. राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष निवडणूक स्वबळावर लढवेल असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या सर्व २१ आणि विधानसभेच्या सर्व १३७ जागां आम्ही स्वबळावर लढवणार आहोेत असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे. त्यांची ही घोषणा म्हणजे भाजप-बीजेडी युती तुटल्याचीच औपचारीक घोषणा असल्याचे मानले जात आहे.