पुणे : सांगली आणि कोल्हापुरात पूर आला तेव्हा भाजप नेते 370 कलम रद्द करण्याच्या जल्लोषात होते. तसेच धरणातून पाणी सोडावे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी असते. ही जबाबदारी सांभाळता न आल्यानेच अपयश झाकण्यासाठी भाजप पुराचे खापर कॉग्रेसवर फोडत असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात केला.
थोरात यांनी शनिवारी सकाळी खडकी आयुध निर्माणमधील आंदोलकांना भेट दिली. यावेळी बोलत होते. शुक्रवारी पुण्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महापुरला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका केली होती. माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.