मुंबई – महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा तैनातीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी व्हॅन उलटल्याने झालेल्या अपघातात किमान 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला.प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने तेथे बंदोबस्त ड्युटीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना राजापूरच्या दिशेने घेऊन जात असताना हे वाहन उलटले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी पोलिसांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारपासून रत्नागिरीत माती सर्वेक्षण होणार आहे. प्रकल्पाला विरोध करणारे काही स्थानिक नागरीक ज्या भागात सर्वेक्षण करायचे आहे तेथे जमले आहेत, त्यामुळे तेथे हा बंदोबस्त तैनात करण्यात येत होता.