बीड रोड रस्त्याबाबत स्वप्नील खाडेंची थेट उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार

जामखेड (प्रतिनिधी)- जामखेड हद्द ते बीड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने सारखे लहान-मोठे अपघात होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

शहरातून जाणाऱ्या जामखेड हद्द ते सौताडा घाट (बीड जिल्हा हद्द) पर्यंतच्या रस्त्याचे गेल्या वर्षपासून नूतनीकरण झाले नसल्याने संपूर्ण रास्ता अत्यंत खराब झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी या रस्त्यासाठी दि .२५ रोजी तहसील कार्यालयावर अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दूरध्वनीव्दारे तक्रार केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण या रस्त्याच्या प्रश्न लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे.