अमरावती : संचारबंदीत मित्राने केली मित्राची हत्या, परिसरात खळबळ

अमरावती – अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या संचारबंदीत जिल्ह्यातील परतवाडा शहरात खून झाल्याची घटना समोर आली आहे. दोन मित्रामधील झालेल्या वादातून मित्राकडूनच हा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निखिल मंडले असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. विक्की धाडसे असे आरोपीचे नाव आहे. परतवाडा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. व्यक्तिगत वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक माहितीत दिली आहे.