हेडफोन लाव अन् फीलकर.! अजयच्या आवाजातलं ‘मळवट’ गाणं ऐकाच

मुंबई – हिंदी आणि मराठी कलाविश्वात संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक अशी विविधांगी भूमिका पार पाडणारी प्रख्यात संगीतकार जोडी म्हणजे ‘अजय-अतुल’. या जोडीने अनेक सुपरहिट गाणे कलाविश्वाला दिले असून, त्या सर्वच गाण्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

त्याच्या फँन्ड्री, सैराटमधील गाण्यांना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. दरम्यान, नवरात्रीच्या दिवसांत अजय अतुलच्या एका गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्या रीतीनं

अजयनं हे गाणं सजवलं आहे त्याला तोड नाही. तुम्ही जर हेडफोन लावुन हे गाणं ऐकल्यास त्याचा येणारा फील तर कमाल आहे. अतिशय मंत्रमुग्ध करणार हे देवीचं गाणं चांगलाच व्हायरल झालं आहे.

“डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा….. पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला…. आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं…..”

असा हा गोंधळ असून, आगामी “सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हे गायलं आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी हा गोंधळ लिहिला आहे. तर अजय-अतुल या जोडगोळीने यामध्ये आपल्या स्वरांची जादू टाकली आहे.