Heatwave alert : राज्‍यात पुन्‍हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान 40 अंश सेल्सिअस पार

मुंबई- राज्‍यात काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे.

पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. तसेच काही भागात गारपिटी होण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 5 ते 12 मे दरम्यान,

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांवर गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.