सोलापूर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असून कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकसह पुणे आणि मुंबईबाजार समिती पेक्षाही सोलापुरात कांदा आवक अधिक आहे. गुरुवारी राज्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापुरात सर्वाधिक ५४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. शिवाय इतर बाजार समित्यांच्या तुलनेत भावही समाधानकारक होते.
गेल्या २० वर्षांत सोलापूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतील व्यापारी कांदा खरेदी करत असल्याने आवक तर वाढलीच, शिवायकांद्याचे भावही इतर बाजार समित्यांच्यातुलनेत चांगले राहिले आहेत.
राज्यात इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सर्वाधिक भावमिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील धाराशिव, लातूर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील शेतकऱ्यांचा देखील कांदा विक्रीसाठी सोलापूरकडे ओढा आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी देखील कांदा आणत आहेत. या शेतकऱ्यांसह येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. इथे कांद्यालाजो भाव मिळतो तो नाफेडकडेही मिळत नाही. शिवाय आमच्याकडे पैशाची हमी असते. यामुळेच आता कांदा बाजारपेठेसाठी जागा अपुरी पडू लागली आहे, असे सोलापूरबाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी म्हटले.
आडत व्यापाऱ्यांचे यश
बाजार समितीतील कांद्याच्या आडत व्यापाऱ्यांचा महाराष्ट्रासह बाहेर राज्यांतील व्यापाऱ्यांशीही संपर्क आहे. शिवाय योग्यवजन व तत्काळ पट्टी, फसवणूक होणार नाहीही काळजी घेतली. तसेच कांद्यालाप्रतिक्विंटल १०० रुपये ते ३५०० रुपयांपर्यंतचाभाव मिळत आहे. सरासरी भाव १७००रुपयांपर्यंत आहे. लासलगाव व विंचूर येथे १५५० रुपये भाव मिळाला आहे.