कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच अहमदनगमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. शशिकला पवार या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या बहुमताने  निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यापैकी आज अहमदनगरमध्ये १९६५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे.