वकील दाम्पत्य खून प्रकरणी : श्रीरामपूर बार असोसिएशनचे मुंबईत आंदोलन

श्रीरामपूर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड. आढाव दाम्पत्य् हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर बार असोसिएशनच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.

मुंबई आझाद मैदान येथे विधी व न्याय खात्याच्या प्रधान सचिव सुवर्ण पवळे, सचिव बी. व्ही. गायकवाड यांना महाराष्ट्रातील वकिलांचे निवेदन स्वीकारले. यावेळी श्रीरामपूर वकील संघाचे उपाध्यक्ष सुभाष जंगले, मुंबई वकील संघाचे संतोष जाधव, बाळासाहेब उलटे, दीपक बाराहाते आदी उपस्थित होते.

या निवेदनात बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले म्हणाले की, पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सरकारने याप्रकरणी वेळेत कठोर कारवाई केली नाही तर कुठल्याही राजकीय पक्षांच्या केसेस महाराष्ट्रातील कोणताही वकील चालवणार नाही. त्यामुळे आजच्या आज त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जंगले यांनी दिला.