नावे बदलून योजना पुन्हा सुरू करण्यात मोदी तरबेज : जयराम रमेश

नवी दिल्ली – जुन्या योजनांची नावे बदलून त्या पुन्हा सुरू करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तरबेज आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शनिवारी सोडले.

मोदी सरकारच्या जनधन योजनेला सात वर्षे पूर्ण झाली. त्याचा संदर्भ घेऊन रमेश यांनी ट्‌विटरवरून प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने बचत ठेव बॅंक खाते योजना सुरू केली होती.

जनधन योजना त्याचेच रूप आहे, असे रमेश यांनी म्हटले. आधीच्याच योजना मोदी सरकार नवी नावे देऊन सादर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. आता जनधन योजनेच्या यशाचा उल्लेख मोदींनी केल्यानंतर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली.