पुढील आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास

पुणे – देशातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

दरवर्षी साधारणपणे 1 सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. सलग चार दिवस तेथे पावसाने विश्रांती घेतल्यास मान्सूनने परतल्याचे हवामान खात्याकडून जाहीर केले जाते. परंतु, राजस्थानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे हा प्रवास आता पुढील आठवड्यात म्हणजे 9 ते 14 सप्टेंबर दरम्यान सुरू होईल, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा उशिराने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

Leave a Comment