“जे लोक शेतकऱ्यांच्याविरोधात,मी त्यांच्या विरोधात…”

राजु शेट्टी यांची कर्जमाफीवरून सरकारवर टीका

सिंधुदुर्ग: जो शेतकऱ्यांच्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात असे विधान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावी अशी मागणी शेतकरी संघटना अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सिंधुदुर्गमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असून त्यांना आधाराची गरज आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणाला वेळ नाही. कोकणातील शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी तकलादू आणि फसवी आहे, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आरोप केले. जमिनी विकू नका, शेतीची कास धरा असे शेतकऱ्यांना शेट्टी यांनी आवाहन केले. शेतकऱ्यांच्या विरोधात जो असेल त्याला मी सोडत नाही, सोडणारही नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Leave a Comment