पृथ्वी व मयंक जोडीची अपयशी परंपरा

मेलबर्न – पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल ही सलामीवीरांची जोडी सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यांचे हेच अपयश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातही कायम राहिले आहे. तसेच ही जोडी जेव्हा भारताच्या डावाची सुरूवात करते तो सामना भारताने गमावलेलाच आहे.

आतापर्यंत ही जोडी सहा सामन्यात सलामीला खेळली आहे. या सहाही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यात शॉ आणि मयांक यांनी डावाची सुरूवात केली होती व हे सामने भारताने गमावले होते.

मयांकबरोबर सलामीला खेळताना गेल्या नऊ डावांत शॉ याने 0, 4, 14, 54, 16, 14, 40, 24, 20 अशा धावा केल्या आहेत. तर मयंकने 9, 17, 3, 7, 58, 34, 1, 3, 32 धावा केल्या आहेत. आकडेवारीवरुन हेच सिद्ध होते की ही जोडी नऊ सामन्यांत सलामीला खेळली व ते सर्व सामने भारताने गमावले.

Leave a Comment