पुणे हिट अँड रन प्रकरण: बालन्याय मंडळाची भूमिका आश्चर्यकारक आणि धक्कादायक – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune hit and run case: कल्याणीनगर येथे आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणातील अल्पयवीन कारचालक मुलाला बालन्याय मंडळाने सुनावलेला आदेश हा आमच्यासाठी आश्र्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. ही भूमिका नागरिक आणि प्रशासनाच्या मनात प्रश्र्न निर्माण करणारी आहे. अपघाताचा हा प्रकार अतिश गंभीर आहे. याबाबत लोकांच्या तीव्र संतापजन प्रतिक्रीया आहेत. पोलिसांनी सुरूवातीपासूनच याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आता देखील पोलिस या प्रकरणात जेथेपर्यंत जावे लागेल तेथेर्यंत जातील असे मत राज्याजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मंगळवारी (दि.20) फडणवीस पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

शहरातील बांधकाम व्यवयायिकाच्या अल्पयवीन मुलाने अलीशान पोर्शे कारने पार्टी करून घरी निघालेल्या अनिस अवधिया आणि अश्र्विनी कोस्टा या दोघा आयटी अभियंता मित्र-मैत्रीणीच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही घटना कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली होती.

त्या पार्श्र्वभूमीवर गृहमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात भेट देवून या प्रकरणाची सर्व माहिती घेतली. आत्तापर्यंत याबाबत काय घडले, पुढे काय करणे गरजेचे आहे, अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपायोजन करण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा केली.

निर्भया प्रकरणानंतर, गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींना तो सज्ञान असल्यासारखे गृहीत धरून त्या नियमावली प्रमाणे कारवाई करावी. अशी मागणी बालन्याय मंडळासमोर पोलिसांनी या अपघात प्रकरणात केली होती. तसेच भा.द.वि कलम 304 सारखे कलम गुन्ह्यात लावण्यात आले होते. मात्र दुर्देवाने बालन्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली. याबाबत पुढे निर्णय घेऊ म्हणून थांबले. त्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला.

पोलिसांना हा एक प्रकारचा धक्का होता. यामुळे पोलिसांना टिकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे पोलिसांनी याबाबत सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी सांगितले की, याबाबत पुर्नरविचार करण्याचा अधिकार बालन्याय मंडळास आहे. त्यामुळे तुम्ही परत त्यांच्याकडे जावा. जर त्यांनी याबाबत निर्णय दिला नाही तर तुम्ही आमच्याकडे परत अर्ज दाखल करू शकता. आज किंवा उद्या याबाबत बालन्याय मंडळाकडून निर्णय येणे अपेक्षीत आहे. पोलिसांनी हा प्रकार अतिशय गंभीर घेतला आहे. न्याय मिळेपर्यंत न्यायालयात पोलिस दाद मागतील. पोलिसांनी त्या मुलाला बर्गर, पिझ्झा खाण्यास दिल्याचा पोलिसांवर आरोप आहे. या दोन्ही बाबींची आम्ही चैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून निर्णय घेतला जाईल.