sanjay raut। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उत्साहात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. एका मुलाखतीदरम्यान खरगे यांनी या सार्वत्रिक निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार स्थापन केले. तर राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती आहेत असे म्हटले होते. काँग्रेस अध्यक्षांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाने राहुल गांधींना स्वीकारले आहे.” असे म्हणत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवलाय.
देशाने राहुल गांधींना स्वीकारले sanjay raut।
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मल्लिकार्जुन खरगेयांच्या विधानाचे समर्थन केले. ते म्हणाले, “इंडिया आघाडी जिंकत आहे. पंतप्रधान आमच्या आघाडीचाच असेल. जसे खरगे यांनी म्हटले आहे की, त्यांची निवड राहुल गांधी आहे. मी म्हणेन की संपूर्ण देशाची निवड राहुल गांधी आहे. “आम्ही सर्वजण राहुल गांधींसोबत आहोत. त्यांनी ज्याप्रकारे संपूर्ण देशात कष्ट केले, संपूर्ण देशाने त्यांना स्वीकारले आहे.” असे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे? sanjay raut।
खरगे म्हणाले की, “राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वी दोन ‘भारत जोडो यात्रा’ काढल्या होत्या. निवडणुकीदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारही केला होता. त्यांनी अनेकदा आपल्या सहकाऱ्यांसोबत स्टेज शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. अशा परिस्थितीत, तो सर्वोच्च पदासाठी लोकप्रिय पर्याय आहे.”
काँग्रेसचे सर्वेसर्वा मल्लिकार्जुन खरगे, “पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी माझी निवड आहेत. ते तरुणांचे आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात.” मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी “इंडिया ब्लॉकने ठरवले आहे की आम्ही एकत्र लढत आहोत. जिंकल्यानंतर युती संयुक्तपणे पंतप्रधान कोण होणार हे ठरवेल.”म्हणाले