ऋतू बदल आणि त्वचेची काळजी

सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्‍यात माहिती. आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने रोग्याची काळजी घेणे, पर्यायाने रोगाचे निर्मूलन करणे शक्‍य होते. पृथ्वीवर होणारे बदल लक्षात घेऊन आयुर्वेदाने वसंत, हेमंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर हे सहा ऋतू मानले आहेत. मात्र हे सर्व ऋतू प्रत्येक देशांमध्ये जाणवतातच असे नाही. हेमंत, ग्रीष्म हे उत्तर ध्रुवावर तर वर्षा, शिशिर, शरद हे ऋतू दक्षिण ध्रुवावर आढळतात.

शारीरिक आरोग्याची आयुर्वेदिक संकल्पना तीन ऊर्जा संकल्पनांभोवती रचण्यात आली आहे. हे शरीरातील मानसिक किंवा रासायनिक स्त्रोत आहेत. या ऊर्जा घटकांवर संपूर्ण शरीराची क्षमता अवलंबून असते. वात, पित्त आणि कफ हे तीन रस जीवनाकरता आवश्‍यक असून, यांच्या परस्परकार्यातूनच निरोगी जीवन साकारते. या तीन घटकांमध्ये परस्परांत असंतुलन निर्माण झाल्यास त्याची परिणती विविध प्रकारच्या आजारांची निर्मिती होण्यात होते. दोषाचे असंतुलन त्वचा आणि केस यामध्येही दिसून येते. त्यामुळेच त्वचाविषयक उपचारपद्धतींचे संतुलन करण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासत असून, ऋतूनुसार दोषाचे प्रकार बदलतात.

वर्षा ऋतूतील मुख्य भाग म्हणजे थंड, दमट हवा असून, यामुळे असंतुलन निर्माण होते आणि वात तसेच पित्ताला चालना मिळते. दमट त्वचा आणि केसांना हानी पोहोचवते, सूज येणे, त्वचा निस्तेज होणे आदी आजार डोके वर काढतात.
वात विकाराने दूषित त्वचा व केस
वातामुळे त्वचा तसेच केस आपले पोषकत्व टिकवून ठेवू शकत नाहीत. त्याकरता पोषकत्व वाढवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हज वापरलेली स्कीन केअर उत्पादने टाळावीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते आणि ती कोरडी पडते. तुमच्या त्वचेला तसेच केसांना पुरेसे पोषण मिळावे, यासाठी गरम, पोषक अन्न घ्यावं. कोरडे अन्न टाळा. रात्री लवकर झोपा आणि दररोज तेलाने मालिश करा.

गरम तसेच स्निग्ध पदार्थाचे सेवन करा (तूप व ऑलिव्ह ऑइल सर्वात चांगले)
संपूर्ण दिवसभर कोमट पाणी प्या आणि भरपूर प्रमाणात गोड, रसपूर्ण फळे खा. साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्‍यक असतं.

अल्कोहोलवर आधारित स्कीन क्‍लेनसर्स वापरू नका
साबणाऐवजी चणाडाळीची पावडर वापरा
दाणे, बदाम, अक्रोड आणि त्याचे तेल, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि त्याचे तेल, द्राक्षबियांचे तेल, प्रिमरोज ऑइल, सोयाबीन ऑइल, सर्व प्रकारची धान्ये यांचे सेवन करावं.

कॅफीन, शीतपेय, साखर, चॉकलेट, पोटॅटो चीप्स आणि जंक फूड टाळावं.
पिंडाथायलम किंवा धनवंतरम कुझम्फू किंवा बालअश्‍वगंधी कुझम्फू यासारखे आयुर्वेदिक तेल दररोज आंघोळीपूर्वी 15 मिनिटे लावावं
लवकर आणि नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

पित्तामुळे होणारे त्वचा/ केस विकार
पित्ताने बाधित असलेल्या संवेदनशील त्वचेला शांत करण्यावर भर देणारी उपचारपद्धती उपयोगात आणावी. टॅनिंग सलून्स, स्टीम फेशिअल आणि उन्हात बराच काळ जाणे यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. पित्ताचा त्रास असलेल्यांच्या त्वचेत तेलाचे प्रमाण अधिक असते. आंघोळीकरता थंड पाणी वापरावे. पण बर्फासारखे थंड पाणी वापरू नयेत. जळजळीत, उष्ण अन्नपदार्थ टाळावेत, उन्हात व्यायाम करू नये. सिंथेटिक रसायने, प्रिझव्‌र्हेटिव्ह आणि अन्य परिणाम करणारे घटक टाळावेत.
दिवसातून 2-3 वेळा हिरव्या चण्याची पावडर आणि बेसन (समप्रमाणात) पाण्यात मिसळून चेहरा धुवावा. आंघोळीपूर्वी अर्धा तास चेहऱ्यावर अर्धा चमचा लिंबू आणि काकडीचा रस यांचे मिश्रण लावावे.

शक्‍य असेल तेव्हा मेकअप टाळावा. चेह-यावरील छिद्रे न बुजवणारा पाण्यावर आधारित मेकअप करावा.
पपया, मध, दूध, दुधाची पावडर यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट (25) करा आणि मधात (2 चमचे) मिसळून फेस पॅक म्हणून लावावा. सुकण्यापूर्वी पॅक काढून टाकावा.
आंघोळीपूर्वी मध आणि दह्याचे मिश्रण करून बॉडी मसाज करावा.
सहजगतीने पचण्याजोगे अन्न वापरावे. यात जुने धान्य, तूप घातलेली सूप्स, सुके मांस, डाळी, मध, खडे मीठ, पिपली, गोड, आंबट आणि खारट, भाज्या/ डाळी यांचे कमी तिखट सूप याचे सेवन करावे.

काय टाळाल?
दिवसाची झोप, अतिश्रम, अतिरिक्‍त आर्द्रता टाळा आणि स्वत:ला उबदार वातावरणात ठेवा.
थंडीत काय कराल?
थंडीत आपल्या हातापायाची त्वचा सुरक्षित ठेवण्याकरता आज सौंदर्यक्षेत्रात मेनिक्‍युअर, पेडिक्‍युअर या ट्रिटमेंटच्या पलीकडे जाऊनही काही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नावीन्यपूर्ण ट्रिटमेंट केल्या जात आहेत. फिश पेडिक्‍युअर, ऑइल मेनिक्‍युअर तसंच अनेक प्रकारच्या स्पा थेरपीज अशा वैविध्यपूर्ण ट्रिटमेंट प्रत्येक सलोनमध्ये आपल्याला सहज दिसून येतात. पण वेळेअभावी तासन्‌तास सलूनमध्ये बसून या थेरपीजचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतक्‍या या गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण अशा वेळी करू शकतो. पण या गोष्टींचा आपल्याला साफ विसर पडतो. या वस्तूंपासूनच आपण असे काही स्क्रबर्स, पॅक्‍स आणि लोशन बनवू शकतो ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर घालणा-या हातापायांच्या त्वचेची काळजी घरच्या घरी घेणं सोपं आहे. एका प्लॅस्टिकच्या भांड्यात दोन कप थोडं कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा मीठ घालावं अणि हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे हातापायांना लावावे.

ती निरोगी राहावी यासाठीच्या काही टिप्स :
तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवा. ज्यांच्या शरीरात ग्लुकोजची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यांची त्वचा कोरडी असते.
अति गरम पाण्याने आंघोळ करू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर बबल बाथ टाळा. मॉइश्‍चरायझिंग साबणाची मदत होऊ शकेल. त्यानंतर चांगले स्कीन लोशन लावा. पण पायाच्या बोटांमध्ये लोशन नका लावू. कारण त्यात बुरशी वाढू शकेल.
त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरड्या किंवा खाजऱ्या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.
त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्‍टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक ओषधे आणि मलम लावा. निजंर्तुक कापसाने छोट्या जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्‍टरची भेट घ्या.

थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.
तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्‌सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.