अहमदनगर – श्रीरामपूरच्या नवविवाहितेची माहेरी येऊन आत्महत्या

श्रीरामपूर – मुंबईत दिलेल्या श्रीरामपूर येथील तन्वी चोपडा या नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी आत्महत्या केल्याची घटना घडली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तन्वी चोपडा यांचा श्रीरामपूर-नेवासे रोडवरील औद्योगिक वसाहत नजिक १२ मार्च रोजी रात्री २.३० वाजता मृतदेह आढळला होता.मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली व तणावमुक्त करण्याचे औषधे सापडले होते.पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.दरम्यान, मृत विवाहितेचे वडील भारत नारंग यांनी सासरच्या मंडळी विरोधात दि. १९ रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये यासाठी सासरची मंडळी मानसिक छळ करीत होते.

तन्वीला सामायिक घरात राहू देत नव्हते.तिला स्वतंत्र रूममध्ये राहण्यास भाग पाडीत होते.ती आजारी पडली तर माहेरी पाठवले जायचे. २५ लाख रुपये आणल्याशिवाय घरात घेतले जाणार नाही असे म्हणत शारीरिक छळ केला जात होता.तन्वी माहेरी आल्यानंतर मानसिक छळाला वैतागून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरचे प्रिती चोपडा, राजू चोपडा, मोहित चोपडा आदी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दादाभाई मगरे करीत आहेत.