पिंपरी | महाराष्ट्राचा स्‍वाभिमान राखण्यासाठी कामाला लागा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि कामगार,कष्टकरी, शेतकरी,असंघटित कामगार यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्वरित कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाची राज्यबैठक पुणे पक्ष कार्यालयात कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी कामगार सेल, असंघटित कामगार विभागाचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे, असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, प्र.संघटक सुनील नलावडे, सोशल मीडिया प्रमुख अमोल गायकवाड, असंघटितचे सरचिटणीस शरद पंडित,

निवृत्ती देसाई, सेक्रेटरी बजरंग चव्हाण, नितीन पाटील उपाध्यक्ष, उमेश शिंदे, दिलीप चव्हाण, सुरेश मोरे, मुनिर शेख, रयत चे सुदाम शिंदे, प्रभाकर रहाणे, गुरुदेव सरोदे दीपक थोरात, राजेंद्र लहामगे, राजेश माने, विनोद गवई यांचे सह मुंबई संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर अकोला नागपूर अमरावती सह इतर जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नखाते म्हणाले की वेदांता फॉक्स्वान, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क सारखे प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून महाराष्ट्राला बेरोजगार करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. प्रास्ताविक पुणे शहराध्यक्ष नितिन पाटिल, तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रवीण बल्लाळ तर आभार अमोल गायकवाड यांनी मानले.