जालन्यात शेतकरी पती-पत्नीने संपवले जीवन, परिसरात हळहळ

जालना – शेतकरी पती-पत्नीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात घडली. संजय ढेबे (वय45) आणि संगीता ढेबे (वय40) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. राहत्या घरी गळफास लावून त्यांनी आत्मह त्या केली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ढेबे दाम्पत्याची परिस्थिती अत्यंत हालाखिची होती. काबाड कष्ट करून ते आपली गुजरान करत असत. प्रेमळ स्वभाव असलेल्या ढेबे दाम्पत्याने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या आत्मह त्येचे कारण अद्यप स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांच्यावर एका खासगी बॅंकेचे कर्ज होते, ते फेडायचे कसे या विवंचनेतूनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने हे शेतकऱ्याच्या, जनसामान्यांच्या हिताचे सरकार असल्याचे सांगत आहेत, मात्र दुसरीकडे दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आपले जीवन संपवत असल्याच्या घटना समोर येत आहेत. (Suicide of farmer couple in Jalna)