“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहील” काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली असून दोन गट पडले आहेत. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा पक्ष उभा करतील. तसेच त्यांनी पक्ष उभारणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे, असे विधान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यासंदर्भात त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, … Read more

“काँग्रेसचं समर्थन करणारी शिवसेना आता का गळे काढते ?” आणीबाणीचा उल्लेख करत मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून काँग्रेससोबतची जवळीक वाढवण्यावर भर देण्यात आला. अनेकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींवर स्तुती सुमने देखील उधळली. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाने लोकशाही धोक्यात असल्याचे म्हंटले होते. यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसच्या जवळ चाललेल्या ठाकरे गटावर टीका केली आहे. … Read more

न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली. यानंतर आता राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आडनावावरून करण्यात आलेल्या या निवाड्यानंतर राहुल गांधी यांना जामीन देखील … Read more

विरोधकांच्या एकजुटीसाठी 2024 मध्ये काँग्रेस कोणताही त्याग करायला तयार ! महाअधिवेशनात मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा

नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनामध्ये देशात होणाऱ्या आगामी निवडणुकांसह पक्ष बांधीनीकडे लक्ष दिले जाणार आहे. काँग्रेसच्या या अधिवेशनात कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सत्ताधाऱ्यांसह सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे देखील लक्ष लागले आहे. 85 व्या महाअधिवेशनात काँग्रेसने 2024 मध्ये विरोधी ऐक्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधी … Read more

“दाढी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु…” राहुल गांधींनी वाढलेल्या दाढीबाबत स्पष्टचं सांगितले

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण झाली. काँग्रेस पक्षाला या यात्रेचा चांगला फायदा होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्यात देखील अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या बदललेल्या लूकची चांगलीच चर्चा आहे. वाढलेली दाढी आणि पांढरा टी शर्ट ही जणू … Read more

काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये चूक ! काँग्रेस अध्यक्षांचे थेट गृहमंत्रालयाला पत्र,म्हणाले…

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी ही यात्रा काश्मीरमध्ये दाखल झाली तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान ते प्रवास मध्येच सोडून निघून गेले. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत गृह मंत्रालयाला पत्र … Read more

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसनं उचललं मोठं पाऊल

Congress

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सुधारात्मक उपाय सुचवण्यासाठी कॉंग्रेसने बुधवारी तीन सदस्यीय तथ्य शोध समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत असतील, जे पक्षाच्या एससी विभागाचे प्रमुख देखील आहेत. आगामी स्थानिक निवडणूकीसाठी शिंदे गटाची ‘या’ पक्षासोबत युती समितीचे इतर सदस्य शकील अहमद … Read more

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत…” आशिष शेलारांचा खोचक टोला

मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सामनातून देखील भाष्य करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला. भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची काही विधाने ट्विट करत ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला … Read more

रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी लढवताहेत एकमेकांविरोधात निवडणूक ! गुजरातमधील ‘या’ मतदारसंघात सुरु आहे हाय होल्टेज ड्रामा

नवी दिल्ली – गुजरातमध्ये निवडणुकांचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. भाजपसह काँग्रेस आणि आम आदमी पार्टी देखील मैदानात उतरली असल्यामुळे प्रचारात चांगलाच धुरळा उडताना दिसतोय. संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा आहे ती जामनगर मतदार संघाची. जामनगरमधून क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील २ सदस्य एकमेकांसमोर उभे असल्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला … Read more

“आर्टिकल 370 ना मी मिळवून देऊ शकतो ना काँग्रेस,ना शरद पवार नाही ममता बॅनर्जी…” काँग्रेसच्या माजी नेत्याने स्पष्टच सांगितलं

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आझाद म्हणाले की, आर्टिकल ३७० ना मी मिळवून देऊ शकतो ना काँग्रेस,ना शरद पवार नाही ममता बॅनर्जी. येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे देखील आझाद यांनी याच सभेत सांगितले. आझाद … Read more