‘या’ खासदाराला संसदेच्या ऐवजी प्रथम तुरुंगाची पायरी चढावी लागणार?

नवी दिल्ली- २०१९ लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांवर सध्या शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे. अश्यातच बसपाचे खासदार ‘अतुल राय’ यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अतुल राय यांच्यावर एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. संबंधित पीडित मुलीने राय यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतर … Read more

महामिलावटी आघाडीला जनता म्हणतीये ‘बहुत हुआ’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

रतलाम – लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा येत्या रविवारी 19 मे रोजी पार पडणार असून देशभरातील प्रमुख नेतेमंडळी आपापल्या लोकसभा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील रतलाम येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना विरोधी पक्षांवर चांगलाच निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी शीख दंगली … Read more

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला – अटीतटीच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. कॉंग्रेस महाआघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून निघालेले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि अटीतटीची बनली आहे. प्रचार संपल्याने आता सर्वाचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 17 मतदारसंघांमध्ये 323 उमेदवार रिंगणात … Read more

ज्यांनी कधी मैदान पहिलं नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही – शरद पवार

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यूत्तर देत, मी अनेक निवडणुका पाहिल्या आणि १४ निवडणुका जिंकल्या, त्यामुळे ज्यांनी कधी मैदान पहिलं नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही, असे म्हणत एकदा मैदानात … Read more

चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच महायुतीत फूट  

ठाणे – लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे चार दिवस उरले आहे. सोमवारी (२९ तारखेला) चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, या मतदानापूर्वीच महायुतीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. ही फूट वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून निर्माण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिपाइंने महायुतीचे उमेदवार राजन विचारेंचा विरोध करत … Read more

नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील रोड शो ला सुरवात

वाराणसी – बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या येथील बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसीतील रोड शो ला प्रारंभ केला आहे. वाराणसीमधील लंका परिसरातून सुरु होणारा हा रोड शो दशाश्वमेध घाटापर्यंत जाणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज … Read more

ऍड. अयुब पठाण यांनी रुग्णालयातून गाठले मतदान केंद्र

उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत ऍडमिट : ते सीबीआयचे माजी विशेष सरकारी वकील पुणे – स्वादुपिंडामध्ये कॅल्शियमचे खडे झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ऍडमिट असलेल्या सीबीआयचे माजी विशेष सरकारी वकील अयुब पठाण यांनी काही वेळासाठी परवानगी घेऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पठाण यांच्या स्वादुपिंडामध्ये कॅल्शियाचे खडे झाल्याने ते 7 … Read more

पोलीस सेवेत असून सुद्धा, प्रचारात सामील झाल्याने नरसिंह यादव यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय वातावरण दिसत आहे. सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन वेगवेगळ्या क्लृप्ती करत आहेत. अशातच नरसिंह यादव हे काँग्रेसच्या पक्षाच्या प्रचारामध्ये सामील झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नरसिंह यादव हे सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत असून सुद्धा काँग्रेसच्या प्रचारात सामील झाल्याने त्यांच्यावर … Read more

राज्यात तिसऱ्या टप्प्यात ५७.०१ टक्के मतदान

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार १४ मतदारसंघात एकूण ५७.०१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यासाठी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या १४ मतदारसंघात आज मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी ५ … Read more

पूर्व दिल्लीतून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली –  माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर काल सोमवारी २२ एप्रिल रोजी गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घोषित केली होती. Delhi: BJP's Gautam Gambhir files his … Read more