#VijayHazareTrophy | ऋतूराजच्या दीडशतकी खेळीने महाराष्ट्राचा विजय
राजकोट – कर्णधार ऋतूराज गायकवाडच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या उच्चांकी धावसंख्येच्या लढतीत चंडीगडवर 5 गडी राखून विजय मिळवला. ऋतूराजचे या स्पर्धेतील हे चौथे विक्रमी शतक ठरले. ऋतूराजने नाणेफेक जिंकत चंडीगडला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवताना चंडीगडच्या मनन व्होरा, अर्सन खान व अंकित कौशीक यांनी … Read more