“महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती”; तुषार गांधी यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्याआरोपानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असताना दुसरीकडे भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे.   दरम्यान, या सर्वात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण  होण्याची शक्यता … Read more

“माझ्याकडे भाजपचा संदेश आलाय…आप तोडून भाजपमध्ये या, सर्व CBI -ED प्रकरणे बंद होतील” मनीष सिसोदिया यांच्या खुलाश्यानंतर खळबळ

  दिल्ल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली. आपने देखील सरकार सीबीआय आणि ईडीचा वापर करत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता. आता सिसोदिया यांनी थेट आप पक्ष तोडून भाजपात आल्यास सर्व प्रकरणे बंद करण्याची ऑफर आल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा … Read more

बॉक्‍सर लोव्हलिना बोर्गोहेनचा गंभीर आरोप, म्हणाली” माझ्या प्रशिक्षकांना…”

बर्मिंगहॅम – मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदलले जात आहे. माझ्या प्रशिक्षकांना अधिकाऱ्यांकडून सतत त्रास होत असल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत अडथळे येत आहेत. यामुळे मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अन्यायाला वाचा फोडली … Read more

#video: नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप; म्हणाले,“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  आणि एनसीबीच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावरच एक गंभीर आरोप केला आहे. तसेच, एनसीबीकडून देखील मागील तारखांच्या पंचनाम्यांवर पंचांच्या सह्या घेऊन पंचनामे बदलण्याचे प्रकार केले जात असल्याचे ते … Read more

“फोनवर आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”; रोहिणी खडसेंचा शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी  एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. असे असले तरी जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये  चांगलेच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. जळगावमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना … Read more

“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”

मुंबई –  बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद आतापर्यँत  पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे फक्त ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे! बिगड़े नवाब ने- प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई- लेकिन हर बार झूठ और मक्कारी … Read more

बनावट नोटांच्या केसेस कमकुवत करण्यात फडणवीसांनी वानखेडेंची मदत घेतली : नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत त्यांच्यावर  गंभीर आरोप केले आहेत.  देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं … Read more

समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; पोलीस महासंचालकांना तक्रार करत म्हणाले,…

मुंबई : मुंबईच्या क्रूझ पार्टीतील ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा  प्रकाशझोतात आलेले केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. वानखेडे यांच्यावर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून  पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस … Read more

“परीक्षेच्या प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळे आजचा गोंधळ झाला”; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर मोठा आरोप

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी  शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचा मोठा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी … Read more

“रुपालीताई चाकणकर, माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज मला येथून घेऊन चला”

पुणे : वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी आपल्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आला असून पोलीस आयुक्तांशी … Read more