पुणे जिल्हा : विजेचा कडकडाटाने घरातील उपकरणे जळाली

मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. विजेच्या कडकडाटामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होऊन कळंब गावामध्ये बहुतेक विद्युत पोलवर मोठा जाळ होऊन अचानक हाय व्होल्टेज झाल्याने घरातील दूरचित्रवाणी संच, संगणक, फ्रीज आणि इतर विजेची उपकरणे जळाल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने भरपाई द्यावी, अशी मागणी ही … Read more

पुणे जिल्हा : पाण्याअभावी फळबागा जळाल्या

पुरंदरच्या बागाती भागातील स्थिती : पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण गराडे : पुरंदर हा तसा दुष्कळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. गेल्या वर्षी अत्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाच्या झळा या तीव्र झाल्या असून वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांवर जास्त करून टँकरचीच वर्दळ दिसून येत आहे. येथे नागरिकांनाच पिण्यासाठीच पाणी नसल्याने बागाच्या बागा डोळ्यादेखत जळून जाताना पाहण्या खेरीज बळीराजापुढे कोणताही मार्ग नाही. … Read more

पुणे जिल्हा : ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; शेती पिके जळाली

मंचरच्या भेकेमळ्यातील स्थिती : शेतकरी हैराण मंचर – मंचर परिसरातील भेकेमळा येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून दुरुस्तीअभावी शेतीपिके जळाली आहे. अनेकवेळा महावितरणकडे ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करून देखील दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून सक्तीची वसुली महावितरणने करू नये. मंचर परिसरात अतिशय कमी पाऊस पडला असल्यामुळे भेके मळ्यात … Read more

हडपसर : क्षणात संसार उघड्यावर; घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

हडपसर(प्रतिनिधी) :- हडपसर वैदुवाडी बिराजदारनगर येथे पत्रांच्या घरांना आग लागून बारा ते पंधरा कुटुंबाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. रात्री झोपलेल्या नागरिकांना स्थानिक इतर नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्याने जीवितहानीची मोठी दुर्घटना टळली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.हडपसर अग्निशामक केंद्राच्या दोन गाड्यांच्या द्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. आग कशाने लागली याचे … Read more

आठ जणांना जिवंत जाळले, “बीरभूम हत्याकांडा’च्या CBI चौकशीचे आदेश

कोलकाता – कोलकाता उच्च न्यायालयाने बीरभूम येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या संबंधात पश्‍चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला त्यांची कागदपत्रे आणि अटक केलेल्या आरोपींना केंद्रीय तपास संस्थेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती आर भारद्वाज यांच्या खंडपीठाने … Read more

VIDEO: क्रूरतेची परिसीमा! पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची हत्या करून भररस्त्यात मृतदेह जाळला; नागरिकांकडून घटनेचे चित्रीकरण

लाहोर : पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एका अत्यंत निंदनीय आणि खळबळजनक  घटना समोर आली आहे. कारखान्यातील कामगार आणि इतरांच्या जमावाने एका कारखान्याच्या श्रीलंकन ​​निर्यात व्यवस्थापकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. कारखान्यातील कामगाराच्या जमावाने कामगाराची हत्या करून त्याचा मृतदेह … Read more

धक्कादायक : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला दिले पेटवून, पुण्यातील घटना

पुणे – वडिलोपार्जीत संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला पेटवून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार औंध येथील अनुसया सोसायटीत घडला. आरोपीच्या या कृत्यामुळे बहीण गंभीर जखमी झाली ती उपचार घेत आहे. याप्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणी नगर फेज 2, बिबवेवाडी) याला चतुरशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत राजश्री मनोहर पतंगे (48, … Read more

दुर्दैवी : सहा स्थलांतरीत मजुरांचा होरपळून मृत्यू

अमरावती – आंध्रप्रदेशात आज पहाटे गुंटुर जिल्ह्यात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सहा स्थलांतरीत मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. इलेक्‍ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असे गुंटुंरच्या पोलिस अधिक्षकांनी सांगितले. या प्रकाराच्या नेमक्‍या कारणाचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्राथमिक स्वरूपात जी माहिती घेतली त्यात संशयास्पद … Read more

Pune Crime | येरवडा भागात किरकोळ वादातून मोटार पेटवली; 2 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

पुणे : किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी एका महिलेची मोटार पेटवून दिल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि अल्पवयीन मुले एकाच भागात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुले त्रास देत असल्याने तिने या भागातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे मुलांची तक्रार … Read more

पालघर | घराला आग लागून 4 जणांचा मृत्यू; शेजाऱ्यांनी खिडकी तोडून वाचवला 2 मुलांचा जीव

पालघर – मोखाडा तालुक्‍यतीाल ब्राह्मणगाव येथे रात्री एका घाराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालत या घराची खिडकी तोडून आत अडकलेल्या दोन मुलांची सुटका केली. अनंत मौळे यांच्या घरात किराणा मालचे दुकान आहडे. त्यात त्यांच्यासह त्यांची पत्नी द्वारकबाई, आई गंगाबाई आणि चार मुलांसह ते राहतात. अनंता शेजारच्या खोलीत झोपायला … Read more