राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई – राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व प्रकारे  नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला घातले आहे.  … Read more

रेमडेसिविरची दरकपात तोंडदेखलीच; होलसेल, छापील किमतीत अजूनही मोठी तफावत

– हर्षद कटारिया पुणे – रेमडेसिविर इंजेक्‍शनवरील छापील (एमआरपी) आणि होलसेल किंमत यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. याबाबत “प्रभात’ने दिलेल्या बातमीनंतर वैद्यकीय आणि औषध विक्री क्षेत्रात बरीच चर्चा झाली. मूग गिळून गप्प बसलेल्या यंत्रणेला जाग आली. केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर या इंजेक्‍शनच्या किमती कंपन्यांनी कमी केल्या. पण, मागील महिन्यातील या इंजेक्‍शनचे होलसेल दर आणि कंपन्यांनी आता … Read more

‘विषाणू कोंबण्याचा पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर’

मुंबई –  मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी  देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचा या टीकेवर आता भाजप नेत्यांकडून … Read more

सावधान ! करोनाचा तांडव रोखण्यासाठी मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; पुन्हा एकदा देशव्यापी ‘लॉकडाऊन’?

नवी दिल्ली : देशात करोनाचा वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० … Read more

#videoviral : कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते

मुंबई – करोनावरील महत्त्वाचे औषध असलेले रेमडेसिविर इंजेक्‍शनचे उत्पादन ज्या कंपन्यांकडून केले जाते त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारने या औषधांची मागणी केली असता आम्हाला महाराष्ट्राला हे औषध न पुरण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती या कंपन्यांकडून मिळाली आहे, असा खळबळजनक दावा महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. खुद्द त्यांनी ट्‌विटरवरच ही माहिती दिली … Read more

राज्यातील निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ?

मुंबई – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ मिळू शकते, असे संकेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. राज्य सरकार निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आहे. करोना फैलाव रोखण्यासाठीच्या निर्बंधांचे जनता पालन करत असल्याने मान्य करावे लागेल. … Read more

#coronavirus : कोविड रुग्णालयात अग्नीतांडव; 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली  -देश सध्या कोरोनाचा तांडव सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये  करोना रुग्ण संख्या दुप्पटीने वाढत आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.  याचदरम्यान छत्तीसगड येथील रायपुरच्या पचपेडी नाक्यावर राजधानी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Chhattisgarh: Visuals … Read more

रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी

मुंबई  -महाराष्ट्रातील ऑक्‍सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.  महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्‍सिजन … Read more

‘कोरोना’चं थैमान,अकरा राज्यांत करोनाचे संकट वाढले

नवी दिल्ली  -केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर, कोविड प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश … Read more

मोदी, निवडणूक आयोग दुसऱ्या लाटेस जबाबदार

मुंबई -निवडणुका झालेल्या किंवा होत असलेल्या राज्यांतून अनेक पट वेगाने करोनाचा फैलाव देशभरात झाला. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि मोदी सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. करोना संकटामुळे देशभरात पुन्हा चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदी सरकार, निवडणूक आयोगाबरोबरच भाजपवर निशाणा … Read more