महाविकास आघाडी सरकार हिंदूविरोधी

नगर   -राज्यातील महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी आहे. लव्ह जिहाद, धर्मांतराची सक्ती करण्यापर्यंत प्रकार घडू लागले असतानाही पोलीस कारवाई करणार नसतील तर आता कायदा सुव्यवस्था अवघड होईल. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप नाही तर राज्य सरकारच करत आहे, असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नगर दौऱ्यावर आलेले आ. राणे … Read more

“महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील शेतकरीविरोधी निर्णयांची चिरफाड करणार”

Raju Shetty on MVA government : कोल्हापूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महा विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाची चिकित्सक पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या कार्यकाळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले आहेत त्याची चिरफाड देखील यावेळी करण्यात येईल, अशा शब्दात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी … Read more

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,’‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी…’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाकडून अटक झाल्यानंतर त्यांच्या मागणी राजीनाम्याची भाजप नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येऊ लागली आहे. यावरूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी आंदोलन केले होते. भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली. या होळीचे दहन केले. यावेळी शहर … Read more

Nawab Malik: मलिकांवरील कारवाईचे राज्यभर पडसाद, महाविकास आघाडी सरकारने पुकारले आंदोलन

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आज राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपही आक्रमक झाले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असून नागरिकांच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नांवर मार्ग काढला जाईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील सत्यगाव जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, आदिवासी … Read more

महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही : राज ठाकरे

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी बाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही. तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असे वाटत नाही … Read more

“2 नंबरी सरकारची 2 वर्ष” चित्रा वाघ यांचा भन्नाट कवितेतून आघाडी सरकारवर हल्ला

मुंबई – भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “2 नंबरी सरकारची 2 वर्ष” असे बोचरे शिर्षक देत वाघ यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाली आहे. त्यापाश्वभूमीवर चित्रा वाघ यांनी कविता करत टीका केली आहे. 2 नंबरी सरकारची 2 वर्षं देशमुखांना वसूलीची घाईपरबांची … Read more

रामदास आठवलेंचे ठाकरे सरकारविषयी ‘भाकित’; म्हणाले,” राज्यातील महाविकास आघाडी सरकार…”

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सरकारविषयी मोठे वक्तव्य करत शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने आपला निर्णय बदलावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत असे आठवले यांनी … Read more

“…मग महाराष्ट्राकडे वळा”; राज्य सरकारला उखडून टाकण्याच्या नड्डा यांच्या विधानाला राऊतांचे उत्तर

मुंबई : दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच भ्रष्टाचारी  सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे, असे आवाहन   कार्यकर्त्यांना  केले होते . दरम्यान, जेपी नड्डा यांच्या या आवाहनाचा  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  समाचार घेतला  आहे. “भाजपाची भूमिका मी समजू … Read more

जनतेचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विश्‍वास : नाना पटोले

मुंबई – नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा 45 हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय हा कॉंग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्यासह स्थानिक जनता व कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासूनच धन्यवाद, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष … Read more