नगर | जातीवाचक शिवीगाळ करणार्याला दोन वर्षाची सक्तमजूरी

नगर, (प्रतिनिधी) – जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर.नाईकवाडे यांनी दोषी धरून दोन वर्ष सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. उषाबाई मच्छिंद्र जाधव (वय ५७), कैलास मच्छिंद्र जाधव (वय ३८) व विजय मच्छिंद्र जाधव (वय ३१, तिघे रा. निमगाव वाघा ता. नगर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची … Read more

“वाइनशॉप, ढाबाचालकांनो खबरदार” ; विनापरवानगी मद्यपान करू दिल्यास दंडासह होईल तुरुंगवास

उत्पादन शुल्ककडून आठ महिन्यांत 497 जणांना अटक वालचंदनगर – पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइनशॉप यांसह काही ढाबाचालक व हॉटेलचालक परवानगी नसतानाही दारू पिण्याची परवानगी देताय तर खबरदार! असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्‍साइज) दारू पिणाऱ्यांसह ढाबाचालकांवरही 50 हजारांपर्यंत दंड आणि 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. खात्याने 8 महिन्यांत … Read more

Brij Bhushan Case : ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; आरोपांशी संबंधित फोटो पोलिसांच्या हाती, कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली :- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण फोटो व काही कागदोपत्री पुरावे लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात … Read more

बीरभूम प्रकरणातील दोषींना शिक्षा होईल

ममता बॅनर्जी यांनी दिले पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश कोलकाता – बीरभूम जिल्ह्यात आठ जणांची जमावाकडून जाळून हत्या केली गेलेल्या गावाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भेट दिली. या प्रकरणातील संशयितांनी जर आत्मसमर्पण केले नाही तर त्यांना शोधून काढण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. या हत्याकांडामागे राजकीय हेतू असल्याचा दाट संशयही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. … Read more

खोट्या आश्‍वासनांची कॉंग्रेसला शिक्षा मिळाली

फोर्बेसगंज/ सहारसा (बिहार) – दारिद्रय निर्मूलन आणि शेती कर्ज माफ करण्यासंदर्भात जनतेला खोटी आश्‍वासने दिल्याबद्दल लोकांनी कॉंग्रेस पक्षाला शिक्षा केली असून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील या पक्षाचे संख्यबळ 100 पेक्षाही कमी झाले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणूकीसाठीच्या प्रचारातील अखेरच्या सभेदरम्यान मोदींनी राजद-कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. बिहारमध्ये पूर्वी ‘जंगलराज’ होते, … Read more

मानकुमरे यांना धमकी देणाऱ्यांचा छडा लावावा ः आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जावळी तालुक्‍यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. अशा प्रतिष्ठीत व्यक्‍तीला आणि त्यांच्या मुलाला धमक्‍यांचे फोन येणे ही चिंताजनक बाब आहे. या सर्वाच्या पाठीमागे कोण आहे याचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिसांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार … Read more