“…त्यामुळे मी मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही” ; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं

Raju Shetty ।

Raju Shetty । लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढणार असल्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर स्वतः राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलंय. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात येणार होती  Raju … Read more

Hasan Mushrif : राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या वक्तव्याचा उल्लेख करत हसन मुश्रीफ म्हणाले,”…त्यामुळं मला आता रात्रीची झोप लागत नाही”

Hasan Mushrif : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऐन दिवाळीत ऊस दरासाठी आक्रोश पदयात्रा झाल्यानंतर उपोषण करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच चालू हंगामात ऊसाला एकरकमी ३,५०० उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही, असा निर्धारही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. याच मुद्यावर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरच्या कागलचे आमदार हसन मुश्रीफ … Read more

“राज्यकर्त्यांनो, तुम्हाला खोके मिळाले पण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मोबदला कधी मिळणार?”; मंत्रालयातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राजू शेट्टींचा खडा सवाल

वर्धा : मंत्रालयात अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय. राज्यकर्त्यांनो तुम्हाला पन्नास खोके मिळाले पण माझ्या धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मोबदला कधी मिळणार? असा थेट सवाल … Read more

लबाड लांडगं ढाँग करतंय.! राजू शेट्टींचा सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल; ट्विट चर्चेत

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, सीमावाद यांसह विविध मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. राज्य विधीमंडळाचे शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दरम्यान, अश्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी … Read more

राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : राजू शेट्टी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचे संगितले आहे. महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीतील … Read more

मेघालयातील शेतकऱ्यांनी हमीभावाच्या लढाईसाठी मोठा लढा उभा करावा – राजू शेट्टी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव हवा असेल तर शेतकर्‍यांनी जागृत होणे गरजेचे आहे. तुमच्या घामाचे दाम हवे असतील तर मेघालयातील शेतकर्‍यांनी हमीभावाच्या लढाईसाठी मोठा लढा उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. हिल फार्मर युनियन या मेघालयातील शेतकर्‍यांच्या संघटनेचा आज तिसावा वर्धापन दिवस होता. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेतकर्‍यांच्या … Read more

‘फक्त राजकीय दुकान चालवण्यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन’; सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

मुंबई: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीमध्ये  चांगलाच वाद पेटला आहे. काही तांत्रिक त्रुटीमुळे राजू शेट्टींची आमदारकी इतर कुणालातरी जाण्याची शक्यता आहे. याविरोधात राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणावर म्हटले, ‘राजू शेट्टींच्या आमदारकीचा प्रश्न … Read more

राजू शेट्टी प्रकरणी जयंत पाटील म्हणाले,”विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस राज्य सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी नुकताच चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. … Read more

विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया किंवा मेहरबानी नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – मुळामध्ये विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया नाही किंवा मेहरबानी नाही… स्वाभिमानी पक्ष अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समझोता झाला होता. आणि समझोता 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही दोघांनी ठरवलं होत. मात्र गेल्या सव्वा वर्षात मी या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांसाठी … Read more

.. तर सामूहिक जलसमाधी नक्की – राजू शेट्टी

कोल्हापूर – मागील महिन्यात महापुरामुळे नुकसान झाले, त्यावर शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. आज येथे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला , त्यावेळी ते बोलत होते, जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी … Read more