…तर राहुल गांधी ‘त्या’ आंदोलनातही तोंडावर आपटणार

मुंबई – केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे; तर देशाच्या भविष्यासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करावाच लागेल. नोटाबंदी आणि जीएसटी हा शेतकऱ्यांवरील हल्ला होता. त्यापेक्षाही कृषी कायदे अधिक हानीकारक ठरणार आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शेती वाचवा’ या आंदोलनात मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.

यावरून भाजपा खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘कृषी विधेयकाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषया -मध्येसुद्धा तोंडावर आपटणार आहे . ते पुढे म्हणाले, राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!

. ” असं म्हणत निलेश राणे  राहुल गांधींवर निशाणा साधला.

दरम्यान, पंजाबमधील एका शेतकऱ्याने  मोदी सरकारण जोरदार टीका केली. एमएसपी ठेवण्याविषयीचा दावा म्हणजे जुमलेबाजी आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. भाजप हा श्रीमंतांचा पक्ष आहे. तो पक्ष कधीच गरीब आणि लहान शेतकऱ्यांचा विचार करत नाही, असा आरोप त्या शेतकऱ्याने केला.

Leave a Comment