पापाराझीवर आला रणबीर कपूरला भयंकर राग फोन हिसकला अन्

अभिनेता रणबीर कपूर कधी एकटा दिसतो, कधी आई नीतू कपूरसोबत तर कधी पत्नी आलिया भट्टसोबत. जेव्हा कधी तो सार्वजनिक ठिकाणी दिसला की पापाराझी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. वर्षांपूर्वी, एकदा अशी घटना घडली होती, जेव्हा पापाराझी त्याचा पाठलाग करत होते, तेव्हा त्याने संतापून त्याचा फोन हिसकावून घेतला होता.

पापाराझी वीरेंद्र चावलाने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “सुमारे 10-12 वर्षांपूर्वी माझा एक फोटोग्राफर रात्री फोटो काढण्यासाठी त्याच्या (रणबीर) मागे लागला होता. रणबीर कुठेतरी जात होता, तो कुठे जात होता ते मला माहीत नाही. पण पापाराझी बघताच  त्याची गाडी थांबवली आणि फोटोग्राफरला विचारले की तो काय करतोय, तो त्याचा पाठलाग का करतोय आणि तो कोणासाठी काम करतोय. रणबीरने त्याचा  पापाराझीचा फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला,’जा तुझ्या बॉसला माझ्याशी बोलायला सांग.’

वीरेंद्र पुढे सांगितले, ‘त्याने मला परत फोन केला आणि सांगितले की तो घरी परतत आहे जेणेकरून फोटोग्राफर येऊन त्याचा फोन परत घेऊ शकेल. तो रागावला होता, पण नंतर तो शांत झाला आणि म्हणाला की गोपनीयतेचा आदर केला पाहिजे.’

आगामी काळात रणबीर कपूर या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. नितीश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात रणबीरसोबत सई पल्लवी दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल, लारा दत्त आणि साऊथचा सुपरस्टार यश देखील असल्याची चर्चा आहे.