राज्यात कधी होणार शाळा सुरु ? शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय.

याच मुद्यावर वृत्त माध्यमांशी बोलतांना आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी   राज्यात शाळा कधी सुरू होणार यावर भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की,’ सध्या शाळा सुरु न करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरु करायचे आहे. तसेच येत्या १५ ते २० दिवसांमध्ये ऐकून परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’ 

दरम्यान, परिपत्रकानुसार 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश सरकारने शाळांना दिलेत. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम होते. याबाबत आज  वर्षा गायकवाड आपली भूमिका स्पष्ट केली आहे.