खरंच एक दिवस चंद्र कायमचा नष्ट होईल? पृथ्वीवरचा दिवस असेल फक्त 6 तासांचा ? चंद्राशी संबंधित रहस्ये जाणून घ्या

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण झाल्यापासून सर्वत्र चंद्राची चर्चा होत आहे. चांद्रयान-3 च्या लँडरने चंद्राच्या त्या भागाची अनेक मनोरंजक छायाचित्रे पाठवली आहेत, जी आजपर्यंत कोणीही पाहिलेली नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला चंद्राशी निगडीत अनेक गुपितांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही हैराण व्हाल.
* चंद्र हा ग्रह नाही ! 
चंद्र हा ग्रह नसून एक उपग्रह आहे. ते पृथ्वीभोवती फिरते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. यासोबतच हा सूर्यमालेतील पाचवा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि थिया (मंगळाच्या आकाराचे घटक) यांच्यात भीषण टक्कर झाली होती, त्यानंतर उर्वरित अवशेषांपासून चंद्राची निर्मिती झाली होती.
* चंद्रावर वजन कमी होते ?
1969 साली मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. विज्ञानानुसार चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे चंद्रावर गेल्याने व्यक्तीचे वजन कमी होते. वास्तविक वजनापेक्षा मानवी वजन सुमारे 16.5 टक्के कमी होते.
* झोपेवर चंद्राचा प्रभाव
एका संशोधनानुसार, चंद्रामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या झोपेवर परिणाम होतो. या संशोधनानुसार अमावस्येला लोकांना चांगली झोप येते, तर पौर्णिमेला लोकांना कमी झोप लागते. परंतु संशोधनाला अद्याप पुष्टी मिळालेली नाही, कारण विज्ञान हे सिद्ध करू शकलेले नाही. याबाबत शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.
* चंद्र कायमचा हरवला जाईल ? 
सध्या चंद्र केवळ अमावास्येलाच दिसत नाही. मात्र भविष्यात एके दिवशी चंद्र पूर्णपणे लपून जाईल. याचे कारण म्हणजे दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 3.78 सेमी दूर जात आहे. अशा स्थितीत चंद्राला पृथ्वीभोवती ठराविक अंतरावर फिरण्यासाठी 47 दिवस लागतील. सध्या चंद्र पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा 27 दिवस आणि 6 तासात पूर्ण करतो. चंद्र पृथ्वीपासून अशाच प्रकारे दूर जात राहिला तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि कक्षेपासून दूर अंतराळातच कुठेतरी हरवण्याची भीती आहे. असे झाल्यास पृथ्वीवर दिवसाचा प्रकाश फक्त 6 तास असेल आणि उर्वरित वेळ अंधार असेल, असा दावा केला जात आहे.